Tuesday 27 March 2018

Marathi Kavita : मराठी कविता




काहीजण आपल्या आयुष्यात
येतातच फक्त परत जाण्यासाठी
आपल्याला आपल्यातुन बाहेर काढण्यासाठी
आपल्या ह्दयाचीचोरी करण्यासाठी

काहीजण येतातच आपल्याला वेडं बनवण्यासाठी
आपल्याला जगण शिकवण्यासाठी
एकटेपणात हसवण्यासाठी
स्वत:चे भान विसरण्यासाठी

काहीजण येतातच आपली किंमत समजावण्यासाठी
काहीजण येतातच आपल्यावर जीव लावण्यासाठी
जवळ येऊन कायमच सोडण्यासाठी
सोडून गेले तरी ह्रदयात कायमच राहण्यासाठी




          जाणिव 
जाणिव झाली आहे मला हि आता
नाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,
या मनाला आता तुझ्यामुळे
नाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.

मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.

तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं



नशिबाची भीती 

नको करुस इतके,
प्रेम माझ्यावर.....
प्रेमाची भीती वाटते...!!

नको येऊस जवळ,
माझ्या इतकी.....
दुरावण्याची भीती वाटते...!!

तुझ्या प्रेमावर,
विश्वास आहे माझा.....
पण ???

माझ्या नशिबाचीचं,
मला भीती वाटते....



नसतास भेटला तर

दिवसभर वेड्यासारखी
तुझाच विचार करत बसते
तू नसतास भेटला तर
मी कसे जगले असते

जगण्याच्या साऱ्या दिशांना
अंधाराने कवटाळले होते
प्रकाशाचे किरण काळजात
मला कसे दिसले असते

तू भेटलाच नसता तर
आयुष्य माझे उजळले नसते
माझ्याही नकळत जीवन
माझे कोमेजून गेले असते

या वळणावर भेटलास तू
नियतीचेच असतील संकेत
नाही तर प्रेमाचे क्षितीज
माझ्या मुठीत आलेच नसते